Posts

Showing posts from May, 2021

आमची दक्षिण भारताची सहल भाग २

 संपूर्ण रात्रीचा प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मदुराईला पोहोचलो. स्टेशन जवळच एक उत्तम धर्मशाळा आम्हाला मिळाली. आम्ही तिथे जाऊन पटपट आवरून, न्याहारी करून पुढे कोडाई कॅनालला जायला निघालो. साधारण 3-4 तासाचा रस्ता आणि बराचसा घाटाचा. वळणं वळणं घेत आम्ही 17 सीटर गाडीने पुढे जात होती. आजू बाजूला सर्वत्र हिरवळ आणि शांत वातावरण अहाहा! उन्हाचा थोडा सुध्दा त्रास आम्हाला जाणवला नाही. मग कोडाई आले. सुरुवाती पासूनच वेगवेगळी हॉटेल्स दिसायला सुरू वाट झाली काही रस्त्याच्या शेजारी तर काही उंच डोंगरांवर. मला तर मुंबईला जाताना खंडाळा दिसतो तसेच काहीसे वाटले. हवेतला गारवा मनालही सुखावत होता. तिथले १-२ पॉइंट बघून आम्ही जेवणासाठी हॉटेल मध्ये गेलो अर्थातच पोळी नाही. पण पाहिजे तेवढा भात मिळाला किंवा फक्त भातचं मिळाला 😀 जेवण झाले मग एक जवळच मार्केट मध्ये फेरफटका मारायला आम्ही गेलो. तिथे भरपूर फळांची दुकाने होती. माझा एक मामा मला म्हणाला चल जरा आणि एका फळाच्या दुकानापाशी घेऊन गेला. तिथे फळवाल्याला १०-२० रुपये देऊन म्हणाला या पैशात जेवढी फळे येतील ती दे. त्याने आम्हाला ७-८ फळे दिली. आम्ही दोघांनी त...

आमची दक्षिण भारताची सहल

 या गोष्टी ला आज बरोबर १९ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना दिलेला उजाळा. मोठ्या मामाचा फोन आला. दक्षिण भारताची सहल ठरवतो आहोत तुम्ही येता का? आईबाबांना काही कारणाने शक्य झाले नाही पण मी आणि माझा भाऊ असे दोघे येऊ. हे नक्की झाले. असंख्य प्रश्न मनात होते. पहिल्यांदा इतक्या लांब जाणार. कसे असेल तिथले वातावरण? किती वेळ लागेल? नुसती इडली आणि भाताच खायचा का? चुकून कर चुकलो तर काय? आणि असे बरेच. १८मे २००२ नागपूरहून सकाळची गाडी होती नागपूर ते चैन्नई. आम्ही सगळे मिळून १६ जण होतो. फक्त एक मामा, एक भाऊ आणि माझे आईबाबा एवढे सोडून आम्ही सगळे होतो. आजीपासून(वय वर्ष ६७/६८) ते लहान बहिणी (वय वर्ष६) पर्यंत. नागपूरहून निघालेली गाडी आंध्रप्रदेशातून पुढे दक्षिणेकडे जाणारी. सगळे बरोबर, त्यामुळे मज्जाच मज्जा. जेवणाचा डबा सोबत घेतलेला. दिवसभर गाडीत फिरणेच सुरू होते. कधी या डब्यात तर कधी दुसऱ्या. माझ्या माहेरी रेल्वे नसल्यामुळे मला रेल्वेचा फारसा अनुभव नाही. त्यामुळेही मनात जरा धाकधूक होतीच. हळूहळू मजल दर मजल करत गाडी पुढे जात होती. जेव्हा गाडी आंध्र प्रदेश मध्ये आली तेव्हा गोदावरी नदीचे विस...

कोरोना कोरोना

    कोरोना कोरोना काय सांगू तुला, तू जगणे शिकवले मला! अचानक एके दिवस या जगात तू अवतरलास, सुरुवातीला काय हे समजले नाही आम्हाला, हळू हळू पाय पसरलेस तू या जगात, हाहाकार मजवल्यास पटपट तू सर्वात, अरे ए कोरोना, अरे काय तुला म्हणू? जगणे केले अवघड सगळ्यांचे तू, थाळ्या वाजल्या, दिवे लागले तरी तू जाईन, सर्वत्र पसरून मजा तुला तरी येईन, अजुन अजुनचा हव्यास नाही रे बरा पण आता तू जाणेच योग्य हाच मार्ग खरा सुरू झाली मग लसची गडबड, काही वेळासाठी हादरलास पण तुझी सुरूच पळापळ, इकडून तिकडे वाढतच तू जातो आहेस, कसे थांबवावे तुला , सगळ्यांना कळतच नाहीये बास रे बाबा तुझं , खूप झाला कहर, आता बंद कर तुझी वाढत जाणारी सफर होत जातो आहोत आम्हीच यात सफर कोरोना कोरोना थांबावं तुझा कहर ©kkdhanashree