Posts

Showing posts from April, 2021

पत्रलेखन

 मागच्या वर्षी ऑक्टोबर२०२० मध्ये मुलाच्या शाळेत पालकांसाठी काही ऑनलाईन स्पर्धा झाल्या. नृत्य, चित्रकला आणि पत्रलेखन. यातील पत्रलेखन स्पर्धेत मी सहभागी झाले होते. माझ्या पत्रास द्वितीय क्रमांक मिळाला. ते पत्र पुढीलप्रमाणे                           ||श्री||                                             ऑक्टोबर २०२० प्रिय मानवा ,                     सप्रेम नमस्कार कसा आहेस? अशा आहे तुझ्याकडे सर्व कुशल असावे. बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलायचे होते. या जीव सृष्टीनिर्मिती मध्ये मी तुझी (सर्वोच्च) निर्मिती केली. तू पण माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आला आहेस किंवा करतोच आहेस. अरे पण तुझ्या विज्ञानातील प्रगतीमुळे तू मला कुठे ना कुठे सतत दुखावतो आहेस. मी कधी कोणाला कृपाळू तर कोणाला क्रूर वाटतो आहे. तुझ्या म्हणण्यानुसार मी लहरी बनतो आहे. पण खरंचच तसे आहे का...

अन्नपूर्णा

 चैत्र महिना सुरुवात. गुढीपाडवा झाला आणि काल चैत्रगौरीचे आगमन झाले. आता खरी उन्हाळ्याला सुरूवात झाली म्हणता येईल. मस्त कैरीचे आंबटगोड पदार्थ, आंब्याचा रस, श्रीखंड, थंडगार सरबत, पन्हे, अहाहा! काल कैरीची डाळ आणि खीर याचा नैवेद्य झाला. कोकिळेच्या कुजन आता जोरदार सुरू झालेले जाणवते. काळानुरूप गोष्टी बदलत गेल्यात हे नक्की. चैत्र महिना आला की सगळ्या गोष्टी जोमाने सुरू व्हायच्या. वर्षभराचे पापड, कुरडई, सांडगे,शेवया अशी वर्षभराची साठवण म्हणजे उन्हाळी कामांना सुरुवात. लहानपणी आई, आजी यांना ही कामे करताना पाहिले आहे. गव्हाचा चिक, पापडाची लाटी खाल्ली आहे. घरातल्या सर्व स्त्रिया एकत्रित जमल्या की ही कामे जोमाने होत. ठरवून आज हे उद्या ते असे असायचे. चैत्र गौरीच्या निमित्ताने माहेरवाशीण घरी आल्याने घर गजबजून जायचे. हळदीकुंकू हे मात्र ठरलेलेच. त्यातून जर २-३ जणींनी एकत्र केले तर ती मज्जा वेगळीच. मी लहानपणी अनुभवली आहे ती मज्जा. कैरीची झणझणीत डाळ आणि पन्हे. आता फारसे कोणी हे सगळे करायला उत्सुक नसते. त्यातून गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनाचे सावट. मग तर नकोच. पण आपली संस्कृती आपल्याला काही ना का...